कालिदास

 कालिदास -  इसविसनाच्या ५ व्या शतकात गुप्त साम्राज्यात बहरलेला कवी - नाटककार.  निश्चित काहीच माहिती उपलब्ध नाही, पण सर्वमान्य माहिती अशी. 

त्याला विक्रमादित्याच्या नवरत्नांपैकी एक गणला जातो. कुठला विक्रमादित्य याबद्दल वाद आहेत. 

उज्जैन त्याची अतिशय प्रिय नगरी आहे असे दिसते. तसेच तो शिवाचा निःस्सिम भक्त होता. 

त्याची साहित्यसंपदा - अभिज्ञान शाकुंतलम्, विक्रमोर्वशीयम् आणि मालविकाग्निमित्रम् हि नाटकं,  रघुवंशम्, कुमारसंभवम्  आणि मेघदूतम् ही काव्यं.

कालिदासाच्या काव्याबद्दल एक कवी श्रीकृष्ण म्हणतो,
अस्पृष्टदोषा नलिनीव द्रुष्टा
हारावलिव ग्रथितागुणोद्यैहि
प्रियन्कपालीव विमर्दहृद्या
न कालिदासात्‌ अपरस्य वाणी

नलिनी  सूर्यविकासी असते, तिला रात्रीचा स्पर्श नाही, तसा कालिदासाच्या वाणीला दोषाचा वा काळ्याचा स्पर्श नाही. प्रियेच्या अंकाचे (मांडीचे)  मर्दन करणे जेवढे erotic असते, मर्दन जेवढे जास्त केले असता आनंद जास्त मिळतो, तशीच ही वाणी जेवढ्या वेळा परत परत वाचाल तेवढा आनंद वाढतो. 

 "उपमा कालिदासस्य" अर्थात तो उपमा अलंकाराचा सम्राट होता असं समजलं जातं. 

आचार्य वामन यांनी नवव्या शतकात काव्यांचं रीतिंमध्ये वर्गीकरण केलं. त्या वर्गीकरणानुसार, कालिदासाचं काव्य हे वैदर्भी रीतिचं उत्तम उदाहरण आहे. 

वैदर्भी रीतिचं हे हिंदी विवेचन: इसका प्रयोग विदर्भ देश के कवियों ने अधिक किया है, इसी से इसका नाम वैदर्भी पड़ा। इसका एक अन्य नाम ‘ललिता ‘ भी है। मम्मट ने इसे ‘उपनागरिका’ कहा है। वैदर्भी रीति के सम्बन्ध में आचार्य विश्वनाथ का कथन है –

माधुर्य व्यंजक वर्णे:रचना ललितात्मका ।
आवृत्तिरल्यवृत्तिर्या वैदर्भी रीति रिष्यते ॥
अर्थात माधुर्य व्यञ्जक वर्णों से युक्त, समासरहित ललित प रचना को ‘वैदर्भी’ रीति कहते हैं। यह रीति श्रृंगार रसकरुण रस एवं शान्त रस के लिए अधिक अनुकूल होती है।

रुद्रट के अनुसार यह समासरहित श्लेषादि दस गुणों और अधिकांशतः चवर्ग से युक्त, अल्प प्राण अक्षरों से व्याप्त सुन्दर वृत्ति है। इसमें सानुनासिक शब्द (जिन पर चन्द्र बिंदु लगा होता है या जिनका उच्चारण नाक सा होता है ) अधिकांशतः प्रयुक्त होते हैं। कालिदास इस रीति के प्रयोग में अत्यन्त प्रवीण थे। हिन्दी के रीतिकालीन कवियों ने इस रीति का भरपूर प्रयोग किया है। बिहारी के निम्नांकित दोहे में इस ‘रीति’ की छटा देखिये -

रस सिंगार मंजनु किये कंजनु भंजनु दै न ।
अंजनु रंजनु ही बिना खंजनु गंजनु नैन॥ (बिहारी सतसई )
( यहाँ पर अनुस्वार का भरपूर प्रयोग हुआ है, सामासिक पदावली नही है, चवर्ग छाया हुआ है, पद मे माधुर्य है।)

Comments